Wednesday, 4 January 2017

योगायोग आणि सत्तायोग

भाजपने उत्तर प्रदेश जिंकले तर काय होईल यापेक्षा जिंकले नाही तर काय होईल, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरणार आहे.
सत्ता हाती असली की अनेक योगायोग साधता येतात. इतकी वर्षे हे असे योगायोग साधण्याचा अधिकार काँग्रेसकडे होता. सध्या आता भाजपची त्यावर मालकी आहे. हे असे करता येते कारण ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ ही म्हण भारतीय राजकारणाइतकी अन्य कशालाही लागू होत नाही. म्हणजे सत्तेची लाठी हाती असेल तर सगळ्या म्हशी तुमच्या मागे आपोआप येतात. उदाहरणार्थ निवडणूक आयोग. या आयोगाने बुधवारी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या  राज्यांतील निवडणुकांची घोषणा केली.
तेव्हा वर उल्लेखिलेल्या योगायोगांची मालिका पुढे राहील याची खात्री बाळगलेली बरी. कारण योगायोग आणि सत्तायोग यांचा थेट संबंध असतो. म्हणून उत्तर प्रदेशातील योग हे देशासाठीही महत्त्वाचे ठरणारे आहेत.

No comments:

Post a Comment