'अर्धसत्य','शक्ती','बाजार','उंबरठा','जैत रे जैत','मिर्च मसाला'या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाने चित्रपटसृष्टीत दरारा निर्माण करणा-या अभिनेत्री स्मिता पाटील यांचा 13 डिसेंबर रोजी स्मृतीदिन होता त्यानिमित्त.
दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.मराठी व हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीवर दोन दशके अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले,हासवले,विचार करायला भाग पाडले.स्मिता पाटील यांना जाऊन आज 25 वर्षे झाली.परंतु,चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री कोण असा प्रश्न उपस्िथत झाल्यास आजही स्मिता पाटील यांचे नाव तोंडात येते.स्मितानंतर हिंदी आणि मराठीतही अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या,पण स्मिताचे नाव कधीच विस्मरणात जाणार नाही.सध्याच्या पिढीला स्मिता पाटील कधीच भेटणार नाहीत,पण आई-वडिलांकडून त्यांच्या आठवणीतीलस्मिता मात्र नक्कीच भेटत राहणार.
वृत्तनिवेदिका म्हणून काम करत असतांना श्याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनय क्षमता ओळखून तिला 1975 मध्ये'चरणदास चोर'या चित्रपटात घेतले.पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
1970-80च्या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली.समाजातील अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले.मुळात स्मिता एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्यामुळे तिला सामाजिक प्रश्नांविषयी कळवळा होता.तिने स्त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले.त्यामुळे'मिर्च मसाला'मधील सोनबाई,'अर्थ'मधील कविता सान्याल महिलांना आपलीशी वाटली.मराठीतील'उंबरठा'चित्रपटातील सुलभा महाजन म्हणजे जणूकाही आपल्या मनातली एक भावना आहे,असे त्याकाळी अनेक महिलांना वाटत.समांतर चित्रपटांनंतर तिने काही व्यावसायिक चित्रपटही केले.'शक्ती','नमकहलाल'हे तिचे व्यावसायिक चित्रपटही सुपरहिट झाले.श्याम बेनेगल,रमेश सिप्पी,बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्दर्शकांची स्मिता आवडती अभिनेत्री होती.
असे म्हणतात की,स्मिताचे डोळे खूप बोलके होते. तिच्या नजरेत वेगळी चमक होती.वाचिक अभिनयाबरोबरच डोळ्यांच्या माध्यमातून सांकेतिक अभिनय करण्यातही तिचा हातखंडा होता.विलक्षण अभिनय,सुंदर डोळे,अतिशय हुशार,सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्येक अभिनेत्री जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.पण,'अशी स्मिता पाटील आता होणे नाही'हेच खरे...
दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.मराठी व हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीवर दोन दशके अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले,हासवले,विचार करायला भाग पाडले.स्मिता पाटील यांना जाऊन आज 25 वर्षे झाली.परंतु,चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री कोण असा प्रश्न उपस्िथत झाल्यास आजही स्मिता पाटील यांचे नाव तोंडात येते.स्मितानंतर हिंदी आणि मराठीतही अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या,पण स्मिताचे नाव कधीच विस्मरणात जाणार नाही.सध्याच्या पिढीला स्मिता पाटील कधीच भेटणार नाहीत,पण आई-वडिलांकडून त्यांच्या आठवणीतीलस्मिता मात्र नक्कीच भेटत राहणार.
वृत्तनिवेदिका म्हणून काम करत असतांना श्याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनय क्षमता ओळखून तिला 1975 मध्ये'चरणदास चोर'या चित्रपटात घेतले.पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
1970-80च्या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली.समाजातील अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले.मुळात स्मिता एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्यामुळे तिला सामाजिक प्रश्नांविषयी कळवळा होता.तिने स्त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले.त्यामुळे'मिर्च मसाला'मधील सोनबाई,'अर्थ'मधील कविता सान्याल महिलांना आपलीशी वाटली.मराठीतील'उंबरठा'चित्रपटातील सुलभा महाजन म्हणजे जणूकाही आपल्या मनातली एक भावना आहे,असे त्याकाळी अनेक महिलांना वाटत.समांतर चित्रपटांनंतर तिने काही व्यावसायिक चित्रपटही केले.'शक्ती','नमकहलाल'हे तिचे व्यावसायिक चित्रपटही सुपरहिट झाले.श्याम बेनेगल,रमेश सिप्पी,बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्दर्शकांची स्मिता आवडती अभिनेत्री होती.
असे म्हणतात की,स्मिताचे डोळे खूप बोलके होते. तिच्या नजरेत वेगळी चमक होती.वाचिक अभिनयाबरोबरच डोळ्यांच्या माध्यमातून सांकेतिक अभिनय करण्यातही तिचा हातखंडा होता.विलक्षण अभिनय,सुंदर डोळे,अतिशय हुशार,सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्येक अभिनेत्री जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.पण,'अशी स्मिता पाटील आता होणे नाही'हेच खरे...


Good
ReplyDeleteThanks
ReplyDeleteGood nice
ReplyDeleteBhari
ReplyDeleteThank you priyaa
ReplyDeleteDhanyavad HNumant
ReplyDeleteThank you priyaa
ReplyDeleteदिपक खुपच छान लिहिले आहे. लेखात ज्या वाक्य रचना केल्या आहेत आणि जे संदर्भ दिले आहेत ते खुपच चांगले आहे .
ReplyDelete