बंड केल्यानं मंत्रिपद भेटेल,
ही भाबडी आशा, मग होईल निराशा..
काय भाषा,यांची भंगार आशा,
काय सुरत, काय गुवाहटी..
स्वार्थासाठी यांची गोड-गोड मिठी,
सखे झाले वैरी अन् वैरी झाले पक्के..
अहो, तुमचं आमचं कस हाय मग,
सगळं वक्के -वक्के..
✍🏻 - राजदीप कठाळे
लिहावसं वाटतं ब-याचदा पण समस्त मानव जातीचा शत्रू आडवा येतो माझ्या... हो.. बरोबर ओळखलत.."आळस"च तो... काही सांगण्यासारखं असेलच असं काही नाही...पण कधीतरी काहीतरी "उगीच" घोळत असतं मनात... त्याला वाट करून द्यायची म्हणून हा सगळा फापट-पसारा... इथल्या मजकुराला विशेष काही अर्थ, यमक, किवां अक्कल असेलच असं नाही... आवडला तर नक्की सांगा.. आणि नाही आवडला तरीही सांगा... एक ओळ पुरेशी आहे...टीकेची किवां कौतुकाची..
No comments:
Post a Comment