तेंव्हा जर सावित्रीबाई मागे हटल्या असत्या तर काय झाले असते. तर आज शैक्षणिक,सामजिक,राजकीय, प्रशासकीय,आर्थिक,कला,क्रिडा अशा असंख्य ठिकाणी फक्त अन् फक्त पुरुषच असते पण तसे झाले नाही आज राष्ट्रीय पातळी पासून गाव पातळी पर्यंत महिला काम करतायत यास कारण सावित्रीबाईंचा त्याग आणि धैर्य आहे हे विसरता कामा नये..
आज आपण २१ व्या शतकात आहोत, देश विकसनशील होत आहे मागील महिन्यात आपल्याकडे 5 जी नेटवर्क सुरु झालं, अनेक प्रकारचे रेकॉर्डस रचले जातायत तसेच दोन दिवसांपूर्वी झालेला वटपौर्णिमेचा सण ही झाला अशातच एक पुरोगामी विचार मांडला गेला आणि मांडणारी होती एक महिला.. त्या म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, एका जबाबदार पदावरून बोलत असताना त्या म्हणाल्या 'सत्यवानाची सावित्री समजली,पण ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही' हा विचार त्यांनी मांडला आणि बुरसटलेल्या विचारांनी परत एकदा डोकं वर काढलं. तर थोडस महात्मा ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या काळात जाऊयात जर तेंव्हा हाच विचार त्यांनी आक्रमकपणे मांडला असता तर आज वटपौर्णिमा झाली असती पण वेगळ्या पद्धतीत... मग सावित्रीबाईंना त्रास देणारे विचार आजही आहेत की, फक्त ते आता डिजिटल झाले आहेत.कदाचित हे तंत्रज्ञान शिक्षणामुळेच आले आणि ते पेरायच काम केलं महात्मा फुले यांनी.. शेण, कचरा,घाण याची जागा आता कॉमेंट्सने घेतली ही मोठी शोकांतिका आहे, तेंव्हाही हेचं साध्य करायचं होत धर्म बुडाला.... जग बुडणार....कली आला आता कॉमेंट्समुळे,बुरसटलेल्या विचारांमुळे हे सर्व होणार... होय होणार...
लक्षात ठेवा .. त्या सावित्रीने शिक्षणासाठी भोगलं पण या सावित्रीच्या लेकी जर पेटून उठल्या तर संहार होईल.
शेवटी एवढंच की,माननीय रुपालीताई यांनी मांडलेला विचार हा प्रत्येक महिला भगिनींच्या उत्कर्षास समर्पित आहे.
- आपलाच
No comments:
Post a Comment