Thursday, 9 February 2017

टणाटण व्हॅलेंटाईन !



सणासुदीची जशी धामधुम सुरू होते तशी वेगवेगळ्या डेचीही धामधूम सुरू असते. डे म्हणजे मन्ना डे, शोभा डे, संडे, मंडे…असे डे नाहीत. तर फादर डे, मदर डे, यंग सिनियर्स डे, पर्यावरण डे, ड्राय डे, व्हॅलेंटाइन डे या डे संदर्भात सांगतो आहे. महाराष्ट्र बंद, भारत बंद हे दिवसही आपल्यासाठी डे च असतात, हा भाग निराळा. असो! यातले बरेचसे डे आपण साजरे करतो. म्हणजे, त्या दिवसापुरतं उरकतो. कधी कधी प्रश्न पडतो, की हे डे प्रकरण नसतं तर काय बिघडलं असतं का? तर आपण आपल्या वडिलांवर-आईवर प्रेम केलं नसतं का, त्यांनीही मुलांवर प्रेम केलं नसतं का, प्रेयसीला छानपैकी भेटवस्तू दिलीच नसती का? असं समजू यातले काही डे व्यवहार्य आहेत. यंग सिनियर्स डे, पर्यावरण डे या डेमधून काहीतरी संदेश मिळतो. यंग सिनियर्स अर्थात ज्येष्ठ नगरिकांविषयी यापूर्वी समाजात फार जागृती नव्हती. निवृत्त झालेत, वय झालं आता म्हातार्‍याचं… या शब्दांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बंदिस्त केलं होतं. या वर्गाच्याही काही समस्या असतील, त्यांचीही काही सुख दुखः असतील याची कुणाला फार फिकीर असल्याचे दिसत नव्हते. पण यंग सिनियर्स डे मुळे या वर्गावर फोकस पडण्यास काहीतरी मदत होते. एक दिवस का होईना त्यांचं अंतरंग आपल्याला समजते. त्यातून पुढे काही संस्था, संघटना, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम राबवतात. कोपर्‍यात पडलेल्या थकलेल्या आई-वडिलांची काही मुलांना आठवण होऊन त्यांना आपली चूक कळून येते… पर्यावरण डेचंही काहीसं असंच असतं. पर्यावरणाच्या विषयी जागृती होण्यासाठी या दिवसाचा हातभार लागतो…असो. असे काही मोजके अपवाद सोडले तर हल्ली कोणताही दिवस डे म्हणून साजरा होऊ लागला आहे. व्हेलेंटाइन डे पासून डे प्रकरणं खर्‍या अर्थाने गाजू लागली. प्रेम करा, असा व्हेलेंटाईन संताने दिलेला संदेश भारतात पोहचला आणि प्रेम या शब्दाविषयी आपण जागृत झालो. आपल्या संतांनी तर अशा कितीतरी शिकवणी दिल्या. पण आपल्याला ज्ञानेश्वर , तुकाराम, नामदेव असे संत चालत नाही. त्यामुळे त्यांचा संदेश आपल्या मनाला भिडत नाही. व्हॅलेंटाईन सारखं भारदस्त नाव असलं की आपल्याला जरा बरं वाटतं… डेचं हे फॅड प्रामुख्याने पाश्‍चात्य देशांतून आपल्या इकडे आलंय. यापैकी बर्‍याच डे च्यापाठी मार्केटिंग फंडा असल्याचं स्पष्ट झालंय. व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारपेठा अशाच फुलून गेल्या आहेत. व्हॅलेंटाईनने जरी निमित्त पुरवले असले आणि या हृदयीचे त्या हृदयी पोचवण्यासाठी आजचा दिवस असला, तरी प्रेमाला मुहूर्त लागत नाही. बालपण संपून तारुण्याची चाहूल लागते, तेव्हा हा गुलाबी रंग मनाच्या क्षितिजावर पसरू लागतो आणि सांजवेळ येऊन सावल्या लांबू लागल्या, तरी त्याची लाली कायम राहते. भेट, नजरानजर, होकार, नकार, वेदना, विरह, त्याग, राग, लोभ, मत्सर या सर्व भावनांचा एकत्रित आविष्कार म्हणजे प्रेम. त्यातही विरह म्हणजे तर प्रेमभावनेचा कळसच. आपल्या प्रियकराची वाट पाहत वाटेवरच कुठेतरी पडून असलेली एक प्रेयसी. तिने बहुधा प्राण सोडले असावेत असे समजून एक कावळा तिच्या अंगावर झेपावतो, तेव्हा ती त्याला म्हणते, कागा सब तन खाईयो, मोरा चुन चुन खाईयो मांसरे, दो नैना मत खईयो, उन्हे पिया मिलन की आस रे…म्हणजे माझ्या शरीराचे वाट्टेल तेवढे लचके तोड; मात्र डोळ्यांवर चोच नको मारूस; कारण त्यांना प्रतिक्षा आहे प्रियकराची. असा ग्रेट विरह. तर दुसर्‍या बाजूला निराशाही तेवढीच सकस. प्रेयसीचे आणखी कुणाशी तरी लग्न झाल्यावर, तो काय म्हणतो? दारावरून माझ्या तिची वरात गेली, मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली, आता कशास तिची पारायणे करू मी, माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली. या दिवसांत कॉलेजा-कॉलेजात गुलाब फुलांच्या देवाण-घेवाणीचे उत्सव असतात. कोण कुणाला फुल देतो, कोण कुणाचे फुल स्वीकारतो, यावर पैजा लागतात. परंतु फुल स्वीकारले म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट केली असे नव्हे. एकमेकांना पारखून, एकमेकांना ओळखून मगच फायनल निर्णय घेण्याएवढी आमची पिढी शहाणी आणि व्यवहारी झाली आहे. कोवळ्या वयात झालेला प्रेमाचा साक्षात्कार हा नजरेचा धोकाही असू शकतो ना? भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, नंतर मजला कळले, ती तशीच पाहते नेहमी. तर अशी फसगत झाली , तर करेक्शनला वाव असावा इतपत आमची पिढी प्रॅक्टिकली विचार करू लागली आहे. अर्थात तरीही आवश्यक तिथे हळवेपणा येतोच आणि तो आलाच पाहिजे; कारण तुम जो आये जिंदगी में बात बन गयी असं मुलायम आवाजात सांगावेसे वाटते, हीच तर या गुलाबी हृदयरोगाची खासीयत आहे. दिले नादॉं तुझे हुवा क्या है, आखीर इस दर्द की दवा क्या है असं उगाचच आडूनआडून विचारण्याऐवजी थेट, तुम्हीने दर्द दिया है तुम्ही दवा देना, असं सांगण्याचे हे दिवस आहेत. व्हॅलेंटाईनचा दिवस असो अथवा नसो !समुद्राच्या साक्षीनं, झाडांच्या आडोशानं रंगीबेरंगी थवेच्या थवे प्रेमकुजन करीत असतात. कटाक्ष, इशारे, सांकेतिक भाषेतील निरोप हे तर सगळीकडेच सुरू असतात. जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कही ये वो तो नही ! तीचा लाजराबुजरा प्रणयही टिकून आहे आणि तुला चार कॉल केले मी, एकालाही उत्तर नाही, गेलास उडत, असा स्वचे भान आलेला नवा प्रणयही आहे. सगळे बदलत असते, तरी काहीही बदलत नसते. असो. या प्रकारचे दिवस साजरे करणं कदापि वाईट नाही. मात्र, त्याला चंगळवादाची जोड देऊ नका असेच माझ्या मित्र मैत्रिणींना  सांगणे आहे. आपली वरिष्ठ मंडळी आपल्या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही, तर त्या सेलिब्रेशनच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात आहे. तेव्हा नाती जपा, नाती जगा. नात्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प या व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने करा. इतकेच.

💐 तुमचा दिप्या 

Monday, 6 February 2017

लोणीकंद ते विद्यापीठ via..... डेक्कन

काय, पी.एम.टी ? कान टवकारले ना ?

हुह्ह! पी.एम.टी.चा विषय निघाला आणि मनात असलेल्या कडू गोड आठवणींनी या लेखातून मोकळी वाट काढली. हा लेख म्हणजे काही पी.एम.टी.चा इतिहास नाही.माझ्या वाटेला पी.एम.टी.चे जे पराक्रम अनुभवले ते लिहीतोय. अजुनही माहित नाही की काय लेखात लिहिणार आणि काय उतरणार... संभालके लो भिडू लोग.

 नगररोड वरच्या कोरेगाव भिमा आणि वाघोलीच्या मधलं एक छोटसं गाव लोणीकंदला रहात आहे. गावची हवा बाकी काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असल्याने दररोज पुण्यात जायचा योग येत असे. अशा वेळी एकमेव साधन म्हणजे पी.एम.टी.,कॉपिटीशन ला फक्त प्रायव्हेट वाहतुक, डुगडुग(?!?) सारख्या ६(ऍक्चुअली १२) आसनी डुकरांचा खूप वावर आहे . पण पी.एम.टी. ने सगळे निमशहरी आणी खेडी-पाडी पुण्याला जोडण्याचं काम केलय. असो ..  सुट्ट्यांमधला प्रवास, नंतर  कॉलेजला जातानाचा रोजचाच पी.एम.टी.ने प्रवास. पी.एम.टी. प्रत्येक पुणेकराच्या मनात एक धृव स्थान तयार करून आहे. २०१६ या वर्षी .....अभिमानाची गोष्ट म्हणजे BRT मार्ग मी याची देही याची डोळा अनुभवलं आहे. पहिल्या बस मध्ये बसण्याचा मान भेटला.
पण काय हो ? कशी आहे पी.एम.टी. सेवा? तिचे कर्मचारी कसे वागतात प्रवाशांशी ? गाड्यांची कंडिशन कशी असते? तिला वेळेचं काही धरबंधन आहे का ?
सगळ्यांची उत्तरे नकारात्मक मिळतात. आहाहा काय ते पी.एम.टी वाहक आणि चालक.
पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता खालील प्रमाणे :-
१) आपल्याला कमीत कमी शब्दात प्रवाशाचा कारण नसताना जास्तित जास्त अपमान करता आला पाहिजे.
२) आपल्या तोंडावर माईक टायसन सारखी मगृरी+घमेंड्+डमस्ती असली पाहिजे.
३) आपल्यात पैसे खाऊ गिरी कुटून कुटून भरलेली असली पाहिजे.
४) महिलां बद्दल थोडा सॉफ्टकॉर्नर असणे आवश्य. 
५) दृष्टीदोष असणे आवश्यक, तो बसस्टॉप १०० मिटर मागे किंवा पुढे आणि बहुतदा दिसलाच नाही पाहीजे या साठी.
६)आपण अशोक सराफ चे जबरदस्त फॅन असले पाहीजे, शर्टच्या पहिल्या ३ गुंड्या फक्त भरतकामाच्या आहेत हे कळल पाहीजे.
७) नवख्या पॅसेंजरचा पोपट करण्याची कुशलता हवी.

असे असतात पी.एम.टी. चालक :
चालक लोक हे सुरूवातीचं आणि शेवटचं स्टेशन फक्त मजबूरी म्हणून बस थांबवतात.फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर उपकार म्हणून थांबवतात (उरनारी माणसं गलका करतील, हे एक अजुन छोटंस कारण). बस मोकळी नेली तरी यांच्या तिर्थरूपांच काहीही जात नसतं. पी.एम.टी.चे ब्रेक्स एक तर अति टाईट नाही तर अति वाईट असावेत
 (अरे दृष्टीदोष असने ही पात्रता आहे नाही का ?) कारण क्वचितच बस योग्य ठिकाणी थांबते. आणि चालक प्रवाशांना कसं पळवलं याचा असुरी आनंद घेऊन मनात हसतो. हा, कोणी बाई कुठे दिसली की लग्गेच काच्च कन् बस तिच्या पायाजवळ थांबते बरका !! आज्जी-अजोबांना बस मधून उतरण्यास वेळ लागला म्हणून चालकाच्या बायकोची डिलेव्हरी हुकली अशा रागाने त्यांना २ शब्द बोलण्याचे अधिकार परमेश्वरानेच बहाल केले असावेत. कोणालाही बस मधे सहजा-सहजी प्रवेश मिळू नये, कारण यामुळे प्रवाशांना कोणतीही गोष्ट स्ट्रगल करून मिळवण्याची जिद्द तयार होईल असा नेक हेतु या मागे असावा. 
चालक(पायलट) लोक पुण्याच्या अति खड्डेमुक्त रोड
(हवाईपट्टी)वरून ही बस (विमान) फार शिताफीने चालवतात(उडवतात). जबरा. काही चालक तर ईतक्या जोरात गाडी हाणतात जणू काही त्यांना 'जोराची' लागलेली आहे .. कधी एकदा थेवटचा स्टॉप येतो आणि कधी मी 'सुलभ' मोकळा होतो असे त्यांना होत असावे.
स्टेरिंग सोडून तंबाखु मळण्यात यांचा हात कोणीच चोळू शकत नाही. आणि कोण आडवा गेला की हे लोक उभी शिवी देऊन आई-बहिणींचे पावित्र्य काढतात. संबंध जगाला चालवण्याची ताकद आपल्यात आली असं हे लोक दाखवतात. बस मध्ये कोणी ओळखीचा चढला की त्याला खास चालक महाराजां शेजारी "इंजिनासनावर" बसण्याचा मान मिळतो, मग हे लोक वैश्विक विषयांवर भारी-भारी चर्चा करतात, ते ऐकण्याचं भाग्य फार थोर. चालकांना छोट्या गाड्यांना कट मारणे, दुचाकीवाल्यांना दाबून रोडखाली उतरवणे,एखाद्याच्या पार जवळ जाऊन बसं थांबवून त्याला चादरीसारखं पांढरं करणे या लिलांपासून एक स्वर्गीय आनंद मिळत असावा.
अशाच सौजन्यमुर्तीचा एक किस्सा :
एक इसम मुंबईहुन पुण्यात प्रथमच आलेले. भोसरी स्टॉपवर बस थांबलेली. चालक महाराज रेडीएटर मधे पाणी भरत होते. भोसरीची बहुतेक बस नाशिक फाट्याहूनच जाते.
(पिंपरी-चिंचवड कडे जाणार्‍या गाड्या सोडल्या तर). त्या इसमाने चालकाला विचारलं "बस नाशिक-फाट्याहुन जाईल काहो ? " , चालक (अत्यंत मंजूळ आवाजात्,ज्या आवाजात आपण कुत्र्याला हाकलतो) "नाय नाय .. बस आळे-फाट्यावरून जाते..." ... मी आणि आमचा ग्रुप मागेच बसलेलो .. "तिथे काय तुझी ........ व्याली आहे का रे लब्बाडा ? " --बाईच्या आवाजात अस्मादिक.आणि पुर्ण बस हास्यझटक्याने हालली. (ड्रायव्हरला थोडी अक्कल असल्याने बिचारा गुपचुप निघुन गेला. नडला असता तर पुर्ण भोसरी-मनपा त्याला नको नको ते ऐकावे लागले असते. आम्ही पी.एम.टी कर्मचार्‍यांविरूद्ध पुकारलेले हे बंड होते). त्याइसमाला सांगितलं बाबा बस तिकडूनच जाते बसा तुम्ही.. पण बाबांचा त्या चालकावर विश्वास, परत ४ लोकांना विचारून चौकशी करत होते. असो ..
असाच एक विनोद आठवला , एक माणूस रोज कामाला जाण्यासाठी सकाळी ९च्या बस ची वाट पाहत असे. एक बस चालक हटकुन थोडी पुढे बस थांबवत असे. आणि माणुस चढायच्या आत पुन्हा बस चालू करून जात असे. एकदा माणसाला बस पकडण्यात यश आलं. तो ड्रायव्हर ला म्हणाला , ही बस काय तुमची कोण नातेवाईक आहे का हो ? चालक - "नाही", माणूस- "मग लांबची नातेवाईक ? " चालक - "नाही", मग घरातली असेल, चालक म्हणाला नाही बुआ ...
माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "

असे असतात पी.एम.टी.चे वाहक :
वाहक हे चालकाला बरोबर कॉप्लिमेंट देत असतात. यांचा पॅसेंजर्स शी जास्त संबंध येतो. हे लोक तोंडात मध घेऊनच असतात. महिलां बरोबर कसे बोलावे यात एकदम निष्णात. आणि कोणी कॉलेजचा पोर्‍या दिसला रे की त्यांचा टोनच बदलतो. म्हणूनच आम्ही असे वाहक फाट्यावर मारलेत (लिट्रली). यांना पैशाचं फार मोल असतं. प्रवाशाने टिकीट मागणे म्हणजे आपला अपमान आहे आणि उरलेले सुट्टे मागणे म्हणजे या बाप्पूला त्याची २ एकर बागायतीच मागितली असं वाटतें.आपण पी.एम.टीचे मालक आणि प्रवाशी आपले कर्जदार आहेत अशी वाहकाची समजूत असते. कोणी दरवाज्यात उभा राहीला की यांना मिरची का लागते कळत नाही. स्वतः तिथेच उभे राहतील मग. सकाळी सकाळी १००-५००ची नोट काढणार्‍याची हे लोक भारी आरती करतात. प्रवाशाला बस मधे घेऊन आपण फार उपकार केलेत अशी यांची धारणा असते.कोणी यांना अमुक ठिकाण आले की सांगा हो असं विचारलं की हमखास माणूस २ स्टेशनं पुढे उतरून पुन्हा रिटर्न येतोच.बाकीच्या पैशांसाठी हे लोक प्रवाशाला शेवटच्या स्टॉप पर्यंत रखडवतात.बिचार्‍या प्रवाशाचा जिव हरणीच पाडस व्याघ्रिये धरीयेले सारख्या हरणी सारख होतं ...आणि शेवटी जर काही घोळ झाला तर हे लोक "बेनिफिट ऑफ डाऊट" स्वता:ला घेतात. प्रवाशी काहीही करो .. पैसे मिळत नाहीत. काही वाहक हे बाजीराव असतात. त्यांनी प्रवाशाकडे येण्या पेक्षा प्रवाशाने त्यांच्या कडे जाऊन टिकीटासाठी भिक मागावी असे त्यांना अपेक्षित असते. अशा कंडक्टर्स कडे आम्ही कधीही जात नाही. आपसूकमग रागारागाने मागे येऊन टिकीट देताना त्याचं तोंड बघताना आम्हाला पण एक असूरी आनंद होतो.चालक -पॅसेंजर्स चे भांडण पी.एम.टी. मधे फार कॉमन आहे. आणि हे झाले की सगळे लोक अगदी सापा-मुंगसाची लढाई बघावी तसे कौतुकाने बघतात. आणि मधुनच येणार्‍या कमेंट्स फारच भारी असतात.एकदा टिपीकल  बाईचं सुट्ट्या पैशावरून कंडक्टर शी वाजलं. कंडक्टर आपण पैसे दिलेत या भुमिकेवर (नेहमीप्रमाणे) ठाम होता. पण बाईच गरम रक्त होतं .. कडाक्कड भांडणाला सुरूवात झाली.. कंडक्टर नी अतिऍग्रेसिव्ह भुमिका घेत.."पैशे धिलेत आं.. बोलायच काम न्हाय सांगुन ठीवतो..च्यायला हेवडंच आसल तर सुट्ट काढायचं (आमच्या ग्रुप मधुन एक बायल्या आवाज ',काय काढायचं हो ?' )जास टरंमटरंम करायच काम नाय". बाई "काय पण हा निर्लज्जपणा ? ३ रुपयांसाठी कसे बोलताय ? तुम्हाला काही रित आहे की नाही...माझे ३ रुपये द्या नाही तर गाडी पोलिसस्टेशनात घ्या ". समोरचा जेवढं शुद्ध मराठी बोलेल त्याच्या १० पट वाहकाची मराठी खालवते. शेजारची बाई लगेच त्या बाईंच्या मदतीला धाऊन आली "होना! कित्ती निर्लज्ज असतात ही लोकं, मेले.." वाक्य तोडत वाहक " ए शेंगदाणे .. तुला काय करायचंय गं?" "तिला कुट घालायचाय"-पुन्हा ग्रुप मधुन एक बायल्या आवाज" भांडण पेटत पेटत जातं शेवटचं स्टॉप येतं .. बाई शेवटचे (बस मधले शेवटचे,ती दिवसभर याला ३ लाख शिव्याशाप देणार हे नक्की.) ऊद्धारोद्गार काढून उतरतात. वाहक अगदीच काही झालं नाही असं दाखवून बेल मारतो.

अशी असते पी.एम.टी बस :
आहाहा ! आमच्या सारखे काय वर्णन करणार या महान वस्तुचं ? पी.एम.टी.ला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला धुण्यात येतं (जाहिराती रंगवायच्या असल्यास तो अपवाद) ... ३६३ दिवस त्यावर हवा,पाणी, धुळ या गोष्टींचा परिणाम होऊन एक सुरक्षाकवच तयार झालेल असतं.एका धुळीने मळलेल्या बस वर कोणीतरी "आता तरी पुसा" अशी सुचना लिहीली होती. बर्‍याच सिटच्या मागे तुम्हाला पुण्याच्या मजनुने आपल्या लैलेच नाव लिहीलेलं आढळेल, किंवा आमका कसा *डवा किंवा *दर*द आहे. ई. गोपणीय माहीती पी.एम.टी. च्या सीट मागे मुद्रित असते. काही ठिकाणी सुचनांचे काने-मात्रे काढून त्याला एक विशिष्ट अर्थ देण्याचा पुणेरीपण आपले पुणेरी पॅसेंजर्स करतात. तुम्ही कधी पी.एम.टी. च्या मागे बाईक चालवली आहे का हो ? कितीही स्वच्छ रोड असू देत,पी.एम.टी मागे एक धूराळा उडवत चालते, जेने करून मागच्यांना त्रास व्हावा. जेंम्स बॉंड चित्रपटांत असाच फंडा त्याच्या गाडीसाठी इंप्लिमेंट केला होता. पी.एम.टी. ची अजुन एक खासियत म्हणजे, अशी एकही पी.एम.टी नाही, जिला कुठूनतरी एखादी खोच लागलेली नाही (हे नजर लागू नये म्हणून असावे) तिच्या अनेक खिडक्यांपैकी किमान एक तरी खिडकी निखळलेली असतेच. जिच्या सर्व खिडक्या शाबूत ती पी.एम.टी. नव्हेच. पी.एम.टी.चा गियर दांडू पाहिलाय का आपण ? तो एक मिटर व्यासाच्या वर्तुळाकार परिघात घुमत असतो. पी.एम.टी प्रवाशांच्या कंफर्ट चा फार विचार करते. म्हणूनच की काय ती एक चालते फिरते मसाज सेंटर आहे. त्यात बसलं की त्या व्हायब्रेशन्स ने तुमचा पुर्ण बॉडी मसाज होऊन तुम्हाला दिवस ऊत्साहात जाईल किंवा दिवसाचा थकवा निघेल.
पी.एम.टी. तुम्हाला संयम कसा ठेवावा हे शिकवते. बसची वाट पाहून पाहून तुमच्या संयमाला एक नविन उंची प्राप्त होते. आपल्या राहुल द्रविडच्या संयमाचं हे एक गुपित आहे. तोही पी.एम.टी. ची वाट पाहून पाहूनच शिकला असावा.
वेळेवर बस आली की तुम्ही फटाके फोडून आनंद साजरा केला पाहीजे. आणि चालकाचा जाहिर सत्कार पण. पी.एम.टी एवढी मजबुत असते(दिसते) की काय सांगू... बहुतांश वेळा डाव्या बाजुला पुर्ण वाकलेली पी.एम.टी. पाहीली की पुणेकराने तिच्यावर किती............ केला आहे असा विचार येवुन डोळे पाणवतात. 

पण मला काही गुणांचं कौतुक करावसं वाटतं... हे चालक लोक कमालीचे डोंबारी आहेत. शनिवार वाडा ते स्वारगेट या रस्त्यावरन दुचाकी चालवनं ही एक कौशल्याचं काम आहेत. आजुबाजुलाच बसलेले ओलं खोबरं,आलं,कोथंबीर विकणारे भाजीवाले, फेरीवाले, आणि पुण्याचे अतिशिस्तप्रिय वाटसरू लोक, आणि जेमतेम बसच्याच रुंदीचे रस्ते... यातुन आपला चालक शिताफीने वाट काढतो. वृद्ध व्यक्तींना चढण्या-उतरण्यास मदत करणारे वाहक आणि जरा जास्त वेळ बस थांबवुन "नीट उतरा हो मावशी, बस थांबलेली आहे, घाई करू नका!" असे म्हणनारे चालक ही आहेत पी.एम.टी. मध्ये 
वाकडे तोंड न करता अगदी ७ रुपयांच्या टिकीटासाठी १००ची मोड देणारे वाहक इथे विरळच.सगळ्या प्रवाशांशी नम्र पणे हसत खेळत प्रवास करवणारे वाहक " मधले पुढे चला, गर्दी करू नका , उतरणारे पुढच्या दाराने उतरा " एका विशिष्ट तालीत म्हणतात तेंव्हा मजाच वाटते. गणपती, दसरा,दिवाळी ला आपल्या बसला चालक-वाहक मस्त सजवतात. जणु आपल्याला रोजी-रोटी दिल्याबद्दल एक छोटीशी परतफेड. सगळे चांगले-वाईट अनुभव घेऊन पण मला माझ्या पी.एम.टी.चा अभिमान आहे. तिच स्थान प्रत्येक पुणेकराच्या मनात अढळ आहे. असे वाटते couple's PMT चालू व्हावी .......... लांब बसली कि खूप वाईट वाटत. पी.एम.टी मध्ये मन पण जुळतात ......


#तुमचा दिप्या 

Saturday, 4 February 2017

संमेलन..... ते संम्मिलन


दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तो वाढतही आहे. या गोष्टी मान्य कराव्याच लागतील; पण तरी सर्वांना सामावून घेणारे.. मराठी साहित्य संमेलनाने आखलेला "उंबरठा' ओलांडून ते आणखी पुढे गेल्यास या संमेलनाचा परीघ आणखी मोठा होईल. हा संमेलनाचा परीघ वाढविण्यासाठी काय व्हायला हवे, यासाठी नवीन तरुण लेखकाना बोलतं केलं पाहिजे. साहित्य आणि साहित्याचं हे भव्य "संमेलन' तुमच्यापर्यंत खरंच पोचतं का, हे संमेलन आम्हा तरुणांचा विचार करतं आहे असं आम्हाला वाटतं का, आमच्यासारख्या तरुणांना व इतर साहित्य रसिकांना सामावून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी संमेलनात नव्यानं यायला हव्यात, सध्याच्या संमेलनातील कोणत्या बाबी तुम्हाला चांगल्या वाटतात-कोणत्या खटकतात, असे विविध प्रश्‍न आम्हा तरुणांना कोणी तरी विचारावेत. संमेलनाचा गाजावाजा अलीकडच्या काळात जास्त होत असला तरी हे संमेलन "पचायला' कमी पडतं आहे, ही खंत अनेकांच्या बोलण्यातून जाणवते पण बोलणार कोण. तसंच साहित्य बाह्य गोष्टींचा संमेलनांमध्ये होणारा शिरकाव या गोष्टीवरही नाराजी व्यक्त करणारे माझ्या सारखे अनेक तरुण आहेत ; पण संमेलनं अशा पद्धतीनं होत असतील तर ती बंद व्हायला हवीत, अशी टोकाची प्रतिक्रिया मुळीच नाही. ही प्रतिक्रिया आम्हा तरुणांची, म्हणजेच आशेचा किरण असल्याचं समजतो. संमेलनं व्हायलाच हवीत; पण ती बाजारू नकोत.. ती अधिकाधिक साहित्य-साहित्यिक-वाचक केंद्रित हवीत. साहित्यात होणारे गट-तट मोडीत काढून त्यांचं संम्मीलन या संमेलनाच्या माध्यमातून व्हावं.. तसंच मराठी साहित्य हे "अखिल भारतीय' इथपर्यंतच न राहता ते राज्याच्या कानाकोपऱ्यात व जगात सर्वत्र पोचण्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर व्हावा.. अशा विविध अपेक्षा व्यक्त करतो.माझ्या सारख्या नवीन लेखन करणाऱ्या अनेक तरुणांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्यास मराठी साहित्य चळवळीत महत्त्वाचं समजलं जाणारं हे संमेलन "शिखर संमेलनाचा' दर्जा नक्की प्राप्त करेल. 

आपला 
दीपक राजेंद्र कठाळे 
    

Friday, 3 February 2017

सह्याद्रीचा मुकूटमणी "हरिश्चंद्रगड"

                                                  
एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणं कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर हरिश्चंद्रगड हे एकमेवाद्वितीय नाव समोर येतं. भटक्या मंडळींनी हरिश्चंद्रगडाची वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्ण होतच नाही... आपण तो पूर्ण अनुभवला नाहीच, अशी भावना सतत मनात येत राहाते.
कित्येक उपमा, उपाध्या मिरवणारा हरीश्चंद्रगड. अर्थात, त्या सर्वच उपाध्या सार्थच म्हणाव्यात, किंबहुना कमीच पाडव्यात असाच आहे हा गड. इतका सुंदर, इतका मोहक, की एकदा भेट देणारा मनुष्य पुन्हा आला नाही, असं होणं केवळ अशक्य. माझ्यासाठी तर हा किल्ला नविनच होता कारण कधी गेलोच नव्हतो जवळ असून सुद्धा. आणि एकदा असच आमचे गुरुवर्य श्री.रमेश खरमाळे यांच्या बरोबर जाण्याचा योग आला एकाच वर्षात दोन वेळा पाहून झालेला आणि त्याची कथाही तशीच सुरस.      

हरिश्चंद्र गड  केवळ सिनेमा, फोटो यांतून आणि माळशेजमधून येता-जाताच पाहाण्याचा योग आला. म्हणूनच  सरांनी आखलेल्या नियोजित ट्रेकिंगला जायचे ठरवले. आम्ही  'सह्यवेडे ' होतो 11 आणि आमचे मोरक्या होते श्री.खरमाळे सर आणि बाकीचे आम्ही टोळी मेंबर.
                                     
श्री.रमेश खरमाळे (माजी सैनिक)        
जन्म-13 नोव्हेंबर 1976 
सैन्यातून सेवानिवृत्ती -1 मे 2012 
सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात कार्यरत आहेत. 
निसर्गरम्य जुन्नर तालुका या सोशल मीडिया पेज चे सर्वेसर्वा आहेत.
तसेच ते शिवाजी ट्रेल व दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य आहेत 
तसेच किल्ले शिंदोळेचे किल्लेदार (समन्वयक) आहेत.
जुन्नर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक लेख ते फेसबुक सारख्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देतात.
काही दिवसांपूर्वी जुन्नर मधील किल्ले हडसर येथे पुण्याचे काही पर्यटक रात्रीच्या वेळी अडकले होते.त्या पर्यटकांना सुखरूप योग्य ठिकाणी आणण्यासाठी श्री.खरमाळे यांनी मोलाचे कर्तव्य बजावले होते. 
जर कोणाला जुन्नरचा निसर्ग अनुभवायचा असेल तर खरमाळे सर ट्रेकिंग कॅम्प नेहमी आयोजित करत असतात.
त्यांचा संपर्क- 8390008370/9420610358 
    दुचाकी असल्याने सैराभैरा पाहता येत होत.(निसर्ग पाहायला टॅक्स लागत नाही ना)वाटेत झरे, नदी, खडी चढण, जंगल सारं अनुभवत आम्ही साधारण काही तासात केदारेश्वर मंदिरापाशी आलो. इथे मंदिरं, गुहा मोठ्या प्रमाणात आहेत; कारण हरिश्चंद्रगड ही तशी प्राचीन तपोभूमी आहे. नंतर माळशेज घाट आणि बाकी परिसरावर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग झाला. मंदिरापाशी आम्ही पोहोचलो, आता ओढ लागलेली ती हरिश्चंद्रगडाच्या सर्वांत मोठ्या आकर्षणाची... कोकणकड्याची.

झरझर आम्ही टेकड्या ओलांडत होतो.काळोख सरसावत
होता.आम्ही खूप पुढे आलो होतो(सर,तान्हाजीभांगले(डॉक्टर),आकाश,प्रदीप,प्रसन्ना, आणि मी) आणि बाकीचे जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी म्हणजे आमचे सहकारी पाठीमागेच राहिले होते त्यांना आणायला मी,प्रदीप,आणि सर पुन्हा मागे गेलो.सर्व रुग्णसेवक सहकारी आम्हाला भेटले त्यांना घेऊन आम्ही निच्छित स्थळी पोहोचलो.आम्ही निवाऱ्यासाठी गुहा शोधात होतो. मेजवानी ची सर्व तयारी झाली होती.फक्त पुढे यायची वाट पाहत होतो. त्याआधी आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे असणाऱ्या कुंडात फ्रेश होण्यासाठी गेलो. (सर,मी,प्रदीप,प्रसन्ना,आणि डॉक्टर)
कुंडात उतरण्याच्या आधी सरांनी मला आणि प्रदीप,प्रसन्ना ला सांगितलं कि ह्या कुंडातल्या महादेवाच्या पिंडाला 21 प्रदक्षिणा घातल्या कि मनातली इच्छा पूर्ण होते.
विचार न करता रात्रीचे 11.30- 12 वाजले असतील. आम्ही तिघांनी 21 प्रदक्षिणा चालू केल्या. बाप रे इतकं थंड पाणी होत कि विचारू नका. (अजब म्हणजे पाणी कंबरे पर्यंतच असते.) आणि मला तरी कंबरे खाली थंड पाण्याने बधिरपणा जाणवत होता. अर्थात प्रदीप आणि प्रसन्ना त्यांचेही हे हाल असतील.एकमेकाला सांगूही शकत नव्हतो का तर जप चालू होता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
माझा मात्र दंतताल चालू होता आणि मध्ये सरांच्या नावाने शि(व्या)वाय हा जप करत होतो. सर मात्र बाहेर बसून आमची गम्मत पाहत होते मग तर अजून त्यांच्या नावाने जप चालू होता.
आमच्या प्रदक्षिणा झाल्या. वीस मिनिटं कमरेखालचा भाग आहे हे मी तरी ठाम सांगू शकत नव्हतो. पुढे आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गेलो. दर्शन छान झालं.तोपर्यंत डिनर ची तयारी बाकीच्या सहकार्यांनी करून ठेवली होती. मस्त छान असा डिनर झाला आणि आम्ही त्या गुहेत झोपण्याच्या तयारीला लागलो. मस्ती ,जोक्स , सांगत आम्ही झोपी गेलो. मी सर्वात कडेला झोपलो माझ्या शेजारी सर त्यांच्या शेजारी डॉक्टर ,प्रदीप,प्रसन्ना,आणि सर्व बाकीचे सहकारी त्यातले ग्रामीण रुग्णालयाचे एक सहकारी खूप आवेशात बोलले जर साप निघाला तर मला सांगा.आम्ही सर्व त्यांच्या भरवशावर झोपी गेली.
लिहताना सुद्धा अंगावर काटा येतोय माझ्या शेजारून एक साप जातोय हे सरांना जाणवलं त्यांनी मला न उठवता डॉक्टरांना उठवलं . मी मात्र स्वप्नाच्या दुनियेत रंगलो होतो.माझ्या पासून त्याला लांब करण्यात सरांना आणि डॉक्टरांना यश आलं. लगोलाग त्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांना उठवलं. आणि मला उठवलं .....दिप्या उठ , साप बघ माझी झोपच गायब मी खाडकन उठून बसलो. त्यांनतर त्या महाशयांना उठवलं ज्यांनी कमेन्टमेंट केली होती साप आला कि मला उठवा त्यांना उठवलं.ते आरामशीर उठले सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला पण सर्वांचे डोळे लगेच मोठे झाले त्यांच्या एका वाक्याने मी कधी म्हंटल मला साप पकडता येतो मी तर म्हंटल साप आला कि मला उठवा आणि मित्रांनो साप आला तुम्ही मला उठवलं त्या बद्दल धन्यवाद.
सर्व जण हसत होते मी मात्र खोट खोट हसत होतो.
सरांनी साप काठीवर धरला आणि लांब सोडून आले. सर्व जण झोपले पण झोपायचं नाटक केलं तुम्हीच सांगा कशी झोप येईल. 
सकाळ झाली सर्व उठलो . मस्त शेकोटी केली चहा घेतला आणि फ्रेश झालो. या काळात सरांची तब्बेत बिगडली त्यांनी माघारी जायचा निर्णय घेतला. सर आणि डॉक्टर परतीच्या वाटेवर लागले. आम्ही पुढे लक्ष्य ठेवले होते




कोकणकडा आणि तारामतीचा कडा.....कोकणकड्यावर बसून मस्तपैकी वारा अंगावर घेण्यात काही आगळीच मजा. जवळपास ३००० फूट उंच कडा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पोखरला गेलाय आणि चांगलाच बाकदार झालाय. याच कड्याच्या उजव्या बाजूने एक नळीची वाट किल्ल्यावर येते.आमच्यातल्या एका सहकार्याने 'आस्तेकदम.....आस्तेकदम...' शिवरायांची वर्दी द्यायला सुरवात केली.त्यांनतर संपूर्ण कड्यात "राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो...."अश्या घोषणा घुमू लागल्या. तेव्हा कोकणकड्यातून येणार प्रतिध्वनी केवळ अनुभवायचीच गोष्ट.त्यातून तो जर शिवरायांचा गजर असेल तर नादच नाही.
आम्ही कोकणकड्यावर जास्त वेळ न घालवता.तारामतीच्या कड्याकडे मार्गक्रमण चालू केले आणि दुपार पर्यंत आम्ही तारामतीच्याकड्यावर पोहचलो होतो. सुर्यास्ताच्या आधी गडाच्या खाली पाहिजे असा निर्धार केला आणि परतीच्या वाटेवर लागलो.
या सर्व भटकंतीत गप्पांचा फड रंगला. प्रत्येकाचे अनुभव, कथा, विनोद असं सगळं जिथे टाईम भेटल तिथे होत होतं
लांबूनच पुन्हा एकदा महादेवाला हात जोडले आणि इथेही पुन्हा जाणवलं. गडावर कचरा अमाप झालाय. पुन्हा येताना याच्या निर्मूलनाचा कार्यक्रम घेऊन यायला हवं, या साऱ्या गोष्टींचा विचार करत. इथून पुढे सर्वांचाच वेग वाढलेला होता. आता घर खुणावत होतं. खाली पोहोचून मागे वळून पाहिल्यावर 'राहिलो असतो आणखी एक दिवस,' असं वाटत राहिलं. 
जुन्नर मध्ये पोहोचल्यावर प्रत्येकजण वदला, 'सर, पुन्हा जायचंच. तारीख बोला फक्त.' याचं कारण एकच, कितीही वेळा जा, कितीही फिरा, हरिश्चंद्रगड 'पूर्ण' होतच नाही..

तुमचा दिप्या