नमस्कार मित्र,मैत्रिणींनो
खूप दिवसाच्या लेखन विश्रांंती नंतर आपल्या बरोबर सवांद साधतोय. दोन दिवसापूर्वी Z टॉकीज या मराठी चित्रपट वाहिनीवर जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट छोटी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात बाहुबली 2 चे वारे वाहत आहे. आणि सगळे रेकॉर्ड हा बाहुबली 2 तोडणार अस आधीच सांगितलं जातंय असो चांगली गोष्ट आहे. पण असे शेतकऱ्याच्या गळ्याला जिवंतपणी लागलेला फास कोण तोडेल का ? का त्याला अस्मानी, सुलतानी संघर्षच करावा लागेल. माहित नाही !
तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातून शेतकी अभ्यासक्रम शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणाऱ्या अडचणी, सरकारी खात्यातला भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलाय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना पण काय आहे ना दाखवणार्यांला पण वेळ नाही आणि पाहणाऱ्याला पण वेळच वेळ नाही. बर गावातला त्याचा जिवलग मित्र तो ही शेतकरीच असतो .
आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या लग्नावरून (इथे काही दिवसांपूर्वी शितल नावाच्या मुलीने आत्महत्या केली तिचे पत्र आठवते.)
"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिस खात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??
आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का ? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं ? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकतो ? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का ? सरकार....सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना एक रात्रच काय अशा अनेक रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे संपले आहे. आश्वासन देऊन देऊन फेस आलाय या पांढऱ्या घोड्यांच्या पण काय आहे ना एक निवडणूक झाली कि दुसरी आली. मग त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकऱ्याचं गार्हाणं सारखं आठवतयं....
"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "
तुमचा
दीपक कठाळे
खूप दिवसाच्या लेखन विश्रांंती नंतर आपल्या बरोबर सवांद साधतोय. दोन दिवसापूर्वी Z टॉकीज या मराठी चित्रपट वाहिनीवर जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट छोटी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात बाहुबली 2 चे वारे वाहत आहे. आणि सगळे रेकॉर्ड हा बाहुबली 2 तोडणार अस आधीच सांगितलं जातंय असो चांगली गोष्ट आहे. पण असे शेतकऱ्याच्या गळ्याला जिवंतपणी लागलेला फास कोण तोडेल का ? का त्याला अस्मानी, सुलतानी संघर्षच करावा लागेल. माहित नाही !
तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातून शेतकी अभ्यासक्रम शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणाऱ्या अडचणी, सरकारी खात्यातला भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलाय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना पण काय आहे ना दाखवणार्यांला पण वेळ नाही आणि पाहणाऱ्याला पण वेळच वेळ नाही. बर गावातला त्याचा जिवलग मित्र तो ही शेतकरीच असतो .
आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या लग्नावरून (इथे काही दिवसांपूर्वी शितल नावाच्या मुलीने आत्महत्या केली तिचे पत्र आठवते.)
"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिस खात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??
आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का ? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं ? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकतो ? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का ? सरकार....सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना एक रात्रच काय अशा अनेक रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे संपले आहे. आश्वासन देऊन देऊन फेस आलाय या पांढऱ्या घोड्यांच्या पण काय आहे ना एक निवडणूक झाली कि दुसरी आली. मग त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकऱ्याचं गार्हाणं सारखं आठवतयं....
"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "
तुमचा
दीपक कठाळे


